
नवी मुंबई प्रतिनिधी:- पादचाऱ्यांचा रस्त्यांवर अग्रहक्क असतो, असं म्हणतात. पण हल्ली रस्ते पादचाऱ्यांसाठी राहिले नाहीतच पण त्यांच्या हक्काचे फूटपाथही त्यांचे राहिलेले नाही. नवी मुंबईत तर सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवरील फूटपाथवर अतिक्रमण झाले आहे. महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, नागरिक, फेरीवाले, पोलिस या सगळ्यांच्याच एकत्रित सहभागातून फूटपाथमुक्त होऊ शकतात आणि चालणाऱ्यांना हक्काची वाट मिळू शकते. फूटपाथ आपल्यासाठी खरंच असतात का, असा नवी मुंबईकरांना कायम प्रश्न पडतो. अतिक्रमण, भिकारी, कचरा, फूटपाथकडे दुर्लक्ष याबद्दलच्या समस्यांना नवी मुंबईत विविध ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सामोरे जावे लागते
फुटपाथवर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. तर काही ठिकाणी फेरीवाल्यांनी फुटपाथवर ताबा मिळवला आहे
फेरीवाले फुटपाथवर बसतात. जो फूटपाथ शिल्लक राहतो त्यावर दुकानदार त्यांच्या दुकानातील साहित्य आणि बोर्ड मांडून ठेवतात. त्यामुळे नागरिकांना चालण्यास त्रास होतो. विशेष करुन महिलांना जास्त त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकदा वादही झाला आहे. असाच प्रकार नवी मुंबई APMC मार्केट गेट क्र.४ वरती दिसून येतो
APMC मार्केट गेट क्र-४ वरील डावी-उजवी दोन्ही बाजूला खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत व या दोन्ही स्टॉल धारकांनी पूर्ण फुटपाथची जागा आपल्या व्यवसायासाठी वापरत आहेत त्यामुळे फुटपाथा वरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागते नक्की फुटपाथ हे व्यवसाय करण्यासाठी आहेत की नागरिकांना चालण्यासाठी आहेत हेच काय समजू शकले नाही स्टॉल धारकांनी तर चक्क फुटपाथ वरती आपल्या ग्राहकांना बसण्यासाठी स्टूल ठेवले आहे या साऱ्या अतिक्रमणामुळे नागरिकांनी कुठून चालावे हे नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी या स्टॉल धारकांनवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही स्थानिक कार्यकर्ते व राजकीय नेते यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केला आहे कधी फुटपाथ मोकळा श्वास घेतील व नागरिकांना आपल्या हक्काच्या फुटपाथ वर केव्हा चालता येणार आहे