
आज दि-23/06/2025 रोजी आलापल्ली येथील विर बाबुराव शेळमाके मुख्य चौकात शरद पवार गटाचे नेते भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन पुकारण्यात आला.
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदे सेना ह्यांचा महायुतीने जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली होती. मात्र सत्तेत आल्यापासून एकही आश्वासनाची पूर्तता होतांना दिसत नाही आहे. उलट संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार व लाडकी बहीण योजना व इतर योजनेचे अनेक लोकांचे पैसे देखील बंद केली आहे. याकरीता आज भर पाऊसात हजारो लोकांसोबत आलापल्ली येथील विर बाबुराव शेळमाके चौकात भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पुढाकाराने बेमुदत ठिय्या आंदोलन चालु आहे.
या ठिय्या आंदोलन मध्ये अनेकांनी या महायुती सरकार बद्दल नाराजगी व्यक्त करीत ही महायुती सरकार गरिबांची नसून मोठमोठ्या पैसे वाल्याचे आहे व गरीब जनतेला मात्र आश्वासन देणे सुरु असल्याचे आपल्या भाषणात मान्यवरांनी व्यक्त केली.
जो पर्यत महायुती सरकार यांनी दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ण करणार नाही तो पर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु राहणार असल्याचे भाग्यश्रीताई आत्राम यांनी सांगितले आहे.