
अनिल खैरनार प्रतिनिधी,कल्याण डोंबिवली आणि परिसरात नागरिकांच्या सुविधे करिता वाहतूक विभाग यांनी “नोपार्किंग”करण्यात येणाऱ्या वाहणावर कारवाई करणे करिता खाजकी कंम्पनी यांना कंत्राट दिला असतांना कंट्रात दाराने ट्युनिंग गाडीवर जे कर्मचारी नेमले आहेत ते त्यांच्या जवळ कोणत्याही प्रकाराचे ओळखपत्र नसतांना देखील दादागिरीने वाहन पूर्व सूचना नदेता गाडीत टाकून त्यांच्या गोडाऊन मध्ये जमा करून त्यांना मनमानी प्रमाणे दंड आकारला जातोय तसेच दंडाची पावती देणे करिता अवैध रित्या ओळखपत्र नसलेले कर्मचारी तेही पोलीस ठाण्यात वरिष्ठान समोर उभे असतात तरी देखील त्यांना जाब विचारला जात नाही, त्यांच्या मुळे मोठया प्रमाणात वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे, सदर कंम्पनीस दिलेला कंत्राट रद्द करावा व क डो. म. पा. यांनी देखील मानधनावर वाहतूक सुरळीत करणे करता वार्डन यांची नियुक्ती केली आहे परंतु वार्डन देखील कमाई साध्य करण्या करिता अधीकार विरहित गैर पद्धतीने वाहन धारकांना अडवून दांडाच्या नावाने लाच घेत आहेत ह्या सर्व विषई वाहतूक उपशाखा यांना पत्र देऊन देखील कारवाई करण्यास मा. सहाय्यक पोलीस उपयुक्त हे दिरंगाई करत आहेत. त्वरित कारवाई करण्यात यावी, वाहन धारकांची होणारी लूट थांबून भ्रस्टाचार करणाऱ्यांना आळा घालावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा रिपाईगवई गटाने दिला आहे.