FB_IMG_1749405428054

🟫 ठाणे - बोरीवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करण्याची मागणी मी मुख्यंत्र्याकडे करणार आहे.

आमचा विकासाला विरोध नाही – पण नागरिकांच्या फुफ्फसावर, वृक्षांवर आणि शांततेवर गदा देणारा विकास नको!

मुल्लाबागसारख्या निसर्गसंपन्न परिसरात हजारो झाडांची कत्तल, धुळीचं साम्राज्य आणि टोल नाका उभारण्याच कटकारस्थान हे सरकार करत आहे.अश्यावेळी नागरिकांच्या या लढ्यात मी त्यांच्यासोबत ठामपणे उभा आहे.

यावेळी रहिवाशांच्या वतीने उमेश अग्रवाल, नितीन सिंह, पंकज ताम्हाणे, पल्लवी शेठ, मधुरेश सिंह, दिपक पांडे, स्टीव्ह थॉमस, विवेक जव्हारकर, रचना वैद्य आदींनी आपली कैफियत मांडली.

Back to top button
error: Content is protected !!