जळगाव:- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांची जळगावात जाहीर सभा पार पडली. सभास्थळी हजर असलेल्या युवकांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले, भाजपला मत म्हणजे तरुणांच्या उज्ज्वल भविष्याला मत. भाजपला मत म्हणजे महान भारताच्या रचनेला मत. शिवाजी महाराजांनी स्वकीय भावना निर्माण केली. देश आज जो उभा आहे त्याची पायाभरणी शिवाजी महाराजांनी केली आहे.
पुलवामामध्ये आतंकवादी आलेत. 10 दिवसांत पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्टाईक केले. काश्मीर आपला हिस्सा आहे की नाही. 370 कलम 70 वर्ष काँग्रेसने हटविले नाही. मोदींना दोनदा पंतप्रधान केले. त्यांनी 370 हटविले. राहुल गांधी म्हणत होते खून की नदीया येतील. पण खून की नदी सोडा साधा दगड उचलण्याची हिंमत नाही झाली, अशी टीका राहुल गांधींवर केली.